कोयना प्रकल्पबाधितांसाठी राखीव असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा काम जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात हाती घेतले होते. ठाणे तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपरी गोठेघर, डायघर, भंडार्ली आणि वालिवली येथील राखीव जमिनीवर मागील तीस वर्षांपासून भूमाफियांनी कब्जा केलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकाम जिल्हा प्रशासनानाने दोन दिवसांची धडक मोहीम राबवित हटविले आहे. यात सुमारे वीस एकर जागेवरील १३ मोठाली भंगाराची गोदामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ताब्यात घेतलेल्या शेतजमिनीचे गणेशोत्सवानंतर बाधितांना हस्तांतरण करण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत.
जिल्हा पुनर्वसन विभागाच्या वतीने मागील आठवड्यात स्थानिक यंत्रणांना कोयना प्रकल्प बाधितांच्या राखीव जागेवरील अतिक्रम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार स्थानिक तहसीलदार आणि अधिकारी वर्गाने शीळ डायघर येथील पोलिसांच्या मदतीने अनधिकृत बांधकाम हटविण्याचे काम हाती घेतले होते. यामध्ये पाहिल्या टप्प्यावर जिल्हा प्रशासनाने ठाणे तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपरी गोठेघर, डायघर, भंडार्ली आणि वालिवली येथील वीस एकर जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. यामध्ये भंगाराची १३ मोठाली