📰 MUMBAI MITRA INTERVIEW
——-
◆ जिद्द ठेवा… मार्ग सापडेल: प्रहावी पाठक
एका ब्राम्हण सुशिक्षित घराण्यात जन्माला आलेली मुलगी आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी कानपुर ते मुंबई प्रवास करते तेही मनोरंजन क्षेत्राच्या झगमगाटात. अशावेळी त्या मुलीला माहित असते की, जे स्वप्न, जी गोस्ट ती पूर्ण करायला जाणार आहे तेथील वाट कठीण आहे. कुटुंबाचा निर्णय घेणे ….ती ज्या वातावरणात वाढली आहे तेथील समाजाची मानसिकता बदलणे शक्य नाही पण म्हणतात ना जिद्द आणि आकांक्षेपुढे गगन ठेंगणे असते आणि हेच सिद्ध करून दाखवले कानपूरच्या प्रहावी पाठक या तरुणीने. पोस्ट ग्रॅजुएशिअन केल्यावर अभिनयाच्या ओढीने तिने कानपुर ते मुंबई प्रवास केला आणि आज ती आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवत आहे. स्वतःचे स्वप्न साकारणाऱ्या कानपुर कन्या प्रहावी पाठक हिच्या जिद्द आणि आत्मविश्वासाची कहाणी तिने दैनिक मुंबई मित्रला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.
—
◆ तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल सांगा ?
माझा जन्म एका ब्राम्हण कुटुंबात झाला असून मी मुळची कानपुरची आहे. पदवी घेतल्यानंतर एम. ए. हिस्ट्रीमधून केले. खरं तर मला आयएएस अधिकारी बनायचे होते. माझ्या कुटुंबात शिक्षणाला अतयंत महत्व आहे. माझे वडील आणि भाऊ दोघेही वकील आहेत.
—
◆ मग अचानक मनोरंजन क्षेत्रात यावेसे का वाटले ?
मला नृत्याची आवड आहे. अभिनय क्षेत्र निवडावे असा विचार माझ्या डोक्यात नव्हता. एकतर घरात शिस्तप्रिय वातावरण त्यात ब्राम्हण-सुशिक्षित कुटुंबात जन्माला आल्यामुळे अभ्यासाचे महत्व जास्त होते. आयएएस अधिकारी बनायचे स्वप्न मी बाळगले होते पण का कुणास ठाऊक अभिनय क्षेत्रात उतरावे असे सतत वाटत होते. विशेष म्हणजे अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे अंकित तिवारी हे माझा आदर्श आहेत. त्यात माझ्या नात्यातील एका मुलगीदेखील अभिनय क्षेत्रात काम करीत आहे. सर्वसामान्य चेहरेपट्टी असलेल्या व्यक्तीला जर काम मिळू शकते तर आपल्याला का नाही हा विचार मानत आला आणि अभिनय क्षेत्रात नशीब आजमाव्याचे असे ठरवले.
—
◆ कुटुंबियांकडून विरोध झाला का ?
अर्थातच….ब्राम्हण कुटुंबात जन्माला आलेली एक मुलगी मनोरंजन क्षेत्रात आपले भविष्य घडवू पाहतेय हे कुटुंबियांना पटणारे नव्हते. त्यांनी माझ्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण माझी जिद्द पाहता त्यांना माझ्या निर्णयासमोर माघार घ्यावी लागली.
—
◆ कानपुर ते मुंबई पर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगा
कानपूरमधील एका छोट्या शहरातून मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात पाऊल ठेवल्यावर नक्कीच धाकधूक वाढली होती. कारण आयुष्यात पहिल्यांदाच कानपुर ते मुंबई इतका लांब प्रवास केला होता. घरच्यांचा विरोध पत्करत मी घेतलेल्या निर्णयाबाबत थोडीशी भीती निर्माण झाली. कारण मुंबई ही अनेकांची स्वप्न नागरी जरी असली तरी ते वेगाचे, स्पर्धेचे शहर आहे. पण काहीही झले तरी हार मानायची नाही हे ठरवले होते, एक जिद्द मनात ठेवली होती.
—
◆ स्वप्ननगरीच्या अनुभवाविषयी सांगा ?
अनेक जण वेगवेगळ्या कारणांसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येतात. काहींना यश मिळते तर काहींना अपयश. तुम्ही तडजोड करीत स्वप्न पूर्ण केलीत तर त्याचा आनंद कधीच मिळणार नाही. पण जर तुमचे ध्येय पक्के असेल तर ते नक्कीच पूर्ण होणार या मताची मी आहे. त्यामुळे येथे आपला निभाव लागणार नाही ….परत जावे असा विचार कधीच केला नाही आणि येथेच ठाण मांडून राहिले आहे.
—
◆ पहिल्या प्रोजेक्टविषयी सांगा ?
अभिनयाची आवड तर होती पण सुरुवात अभिनयापासून न होता डिस्ट्रिब्युटरपासून झाली तेदेखील एका मराठी चित्रपटासाठी. हळू हळू ओळख निर्माण केली. मुंबईत राहून अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतले.
—
◆ तुम्ही कोणत्या चित्रपटात काम केले आहे.
माझी पहिली सुरवात डिस्ट्रिब्युटर म्हणून झाली. त्यानंतर पाटलांची कहाणी, नफिसा, हर हर शंभो तर पंचरत्न नावाची वेब सिरीजमध्ये काम केले आहे. या वेब्सिरीजच्या चौथ्या एपिसोडचे सध्या शूटिंग सुरु आहे. यात मी कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या उद्योजक तरुणीच्या भूमिकेत आहे. सुस्पेंस, थ्रिलर यांचे मिश्रण असलेली ही वेब सिरीज आहे.
—
◆ आगामी प्रोजेक्ट बद्दल सांगा ?
सध्या तरी मी अल्बमसाठी ४-5 गाणी केली आहेत. हिना खान आणि करणसिंग वोहरा यांच्याबरोबर एका अल्बममध्ये तर करणसिंग वोहरा यांच्याबरोबर लीड मध्ये आहे. तर कत्रा कत्रा या गाण्यात झुवेर खान यांच्याबरोबर झळकली आहे. आणखी अजून बरेच अल्बम येणे बाकी आहेत.
—
◆ या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणाईला काय संदेश देणार ?
जर तुमची इच्छा शक्ती दांडगी असेल आणि तुम्ही स्वतःचे २०० टक्के प्रयत्न तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देणार असाल तर का नाही यश तुम्हाला मिळणार. इच्छा, स्वप्न कोणतेही असो तुम्ही जिद्द ठेवा यश नक्कीच मिळेल.
